कोरोनाला घाबरून जावू नये उपचार केल्यास हमखास बरा होतो- डॉ. अमीत साळुंखे

217

पाचोरा प्रतिनिधी शेख जावेद ..
राज्यात सर्वत्र कोरोना साथीचा आजाराने थैमान घातले आहे.या दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना रोगावर उपचार घ्यावा योग्य वेळी उपचार केल्यास कोरोना पुर्ण पणे बरा होतो.पाचोरा ग्रामिण रूग्णालयात आता पर्यंत १६३ पॉझिटिव्ह रूग्ण दाखल करण्यात आले होते.त्यामधून १४२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.१५ रूग्णांवर उपचार सुरू आहे.६रूग्णाचा मृत्यू , रूग्णालयातील उपचार घेणाऱ्यांना रूग्णांना विचारणा केली असता उपचार योग्य पध्दतीने सुरू आहे असे त्यांनी सांगितले पाचोरा ग्रामिण रूग्णालयातील डॉ.अमीत साळुंखे यांनी प्रतिनिधींना माहीती दिली.व जनतेस आवाहन केले कोरोनाला घाबरून जावू नये,सुरक्षित रहा.चेहऱ्यावर मास्क वापरणे बंधनकारक आहे असे आवाहन त्यांनी केले आहे.