जळगाव जिल्ह्यातील राजकारणाचा व विकासाची दूरदृष्टी केंद्रबिंदू नेता म्हणजे – एकनाथराव खडसे

765

दिनेश चौधरी, लोहारा ( प्रतिनिधी ) जिल्ह्यात भाजप विरोधात जनतेच्या मनात खूप मोठा असंतोष निर्माण झाला आहे. आगामी निवडणुकांमध्ये मतपेटीतून जळगाव जिल्ह्याची जनता भाजपाला धडा शिकवणार.माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत घेतली भेट.एकीकडे शारीरिक गुडघ्याच्या आजारापासून त्रस्त असताना सुद्धा जळगाव जिल्ह्याच्या जनतेच्या समस्या व जिल्ह्याच्या जनतेबद्दल असणारे प्रचंड प्रेम हे नाथाभाऊ खडसे यांना स्वस्थ बसू देत नाही.

खडसे यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्र पवार यांची भेट घेतली व जिल्ह्याच्या विकासाबाबत व पावसाच्या वादळीवाऱ्याने ,अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीबाबत चर्चा केली. जळगाव जिल्हा विकासापासून कसा वंचित राहिला आहे हे पवारांना समजावून सांगितले.सध्या जळगाव जिल्ह्याला कोणी वाली नाही, जिल्ह्यात निधी नाही ,कुठला मोठा प्रकल्प जिल्ह्यात नाही, बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध नाही केंद्र सरकारचा कुठलाही निधी अद्याप पर्यंत जिल्ह्याला मिळाला नाही आपण जळगाव जिल्ह्याकडे लक्ष घातले पाहिजे .आमच्या जिल्ह्याला ताकद द्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे तसेच जळगाव जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या.

जेणेकरून आगामी निवडणुकीमध्ये जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संख्याबळ आमदार निवडून येतील सध्या जनतेचा कौल जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे व त्यासाठी मी व माझे कार्यकर्ते सुद्धा आगामी निवडणुकीसाठी सज्ज आहोत. मागील पाच वर्षात भाजपाने जळगाव जिल्ह्याचे वाटोळे केले व्यक्ती दोषी राजकारण करून माझ्यासह जळगाव जिल्ह्याच्या सर्व जनतेला भाजपने वेठीस धरले आणि एक रुपयाही निधी जिल्ह्याला दिला नाही किंवा कुठले मोठे प्रकल्प दिले नाही असे यावेळी एकनाथराव खडसे यांनी शरद पवार साहेबांना सांगितले. सरकार आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व महाविकास आघाडीचा आहे. आपण जिल्ह्याला निधी दिला पाहिजे सामान्य कार्यकर्त्यांचे काम सरकारमध्ये झाले पाहिजे. आपल्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांचे कामे करण्याबाबत तंबी दिली पाहिजे. त्यामुळे पक्षसंघटना मध्येही याचा बराच फायदा होईल असे अनेक विषय अंती नाथाभाऊ खडसे यांनी पवार साहेब यांच्या समोर मांडले व चर्चा केली.

नेता असावा तर एकनाथराव खडसे यांचा सारखा विरोधकांकडून प्रचंड टार्गेट होत असताना मानसिक खच्चीकरण भाजप वाल्यांकडून होत असताना तसेच आजाराने त्रस्त असताना सुद्धा नाथाभाऊ खडसे यांची व्हीलपॉवर खूप मजबूत आहे. हे खचनारे व्यक्तिमत्त्व नाही जळगाव जिल्ह्याची जनता आजही नाथाभाऊ खडसे यांच्यासोबतच आहे. हे नुकत्याच झालेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून जनतेने दाखवून दिले आणि महाविकास आघाडीचे एक हाती पॅनल जिल्हा बँकेत निवडून देऊन नाथाभाऊ यांनी पुन्हा विरोधकांना आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. त्यामुळे भाजपचे अनेक नेते झोपेत बरबळायला लागले आहेत.

जळगाव जिल्हा आणि खडसे साहेब यांचे एक समीकरणच आहे. जळगाव जिल्ह्याचे नाव देशात कुठे घेतले तर एकनाथराव खडसे यांचे नाव पुढे येत असते. नेहमी हेच अनेकांच्या डोळ्यात खुपते आहे. त्यामुळे यांनी खडसे यांच्यासह जळगाव जिल्ह्याच्या जनतेलाही वेठीस धरले आणि पूर्ण जिल्हा विकासापासून वंचित ठेवला आज जळगाव जिल्ह्यात सर्वात मोठी पिण्याची पाण्याची समस्या आहे. तसेच कुठलीही आरोग्य योजना नाही,मोठे हॉस्पिटल्स नाही, जळगाव शहरात जनतेला चालण्यासाठी साधे रस्ते सुद्धा नीट नाहीत. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय लोकांनी आप-आपसातले श्रेय वाद ,तू मोठा की-मी मोठा हे बाजूला ठेवून विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि जिल्ह्याचा विकास केला पाहिजे बहिणाबाई चौधरी यांचा वारसा असलेला आपला जळगाव जिल्हा आहे.

अनेक वर्ष विधानसभेत जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्याच्या लोकांच्या हितासाठी वेळो-वेळी आपले उपद्रव मूल्य एकनाथराव खडसे यांनी दाखवून दिले आहे. मागील फडणवीस सरकार पासून यांना थांबवण्याचे काम करण्यात आले आहे. नुसते नाथाभाऊ यांनाच थांबवले नाही तर जळगाव जिल्ह्याच्या विकासाला सुद्धा थांबवले गेले हे पाप भाजपने केले भारतीय जनता पार्टी नुसतं नाथाभाऊ खडसे यांचा विरोध करत नसून संपूर्ण जिल्ह्याला विरोध करत आहे. हे यातून स्पष्ट दिसते यामुळेच जळगाव जिल्ह्याच्या जनतेमध्ये खूप मोठा भाजप विरोधी असंतोष पसरला आहे आणि हा असंतोष मतपेटी मधून जनता भाजपाला दाखवणारच आहे यात काही शंका नाही. असे प्रतिपादन माळी समाज महामंडळाचे अध्यक्ष ओबीसी नेते व एकनाथराव खडसे यांचे खंदे समर्थक अनिल भाऊ महाजन यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केले.