अमित शाहांनी माझा शब्द पाळला असता तर…आज राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असता, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

163

 प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला असता तर हे महाविकास आघाडीचं सरकार आलेच नसते.  तर आज राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असता, असे ते म्हणाले आहे.

शिवाय नव्या सराकारवर त्यांनी टीका करीत नव्याने घेतलेल्या निर्णयाने मुंबईचे कसे नुकसान केले जात आहे हे पटवून सांगितले. माझ्या पाठीत वार करा म्हणत त्यांनी बंडखोर आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका तर केलीच पण मुंबईच्या हिताचे निर्णय घेतले त्याविरोधात पावले उचलली जात असल्याचेही निदर्शनास आणून दिले आहे. मेट्रोमध्ये आरेचा भाग घेऊ नका असे आवाहानच त्यांनी केले आहे.