राज्यात 15 मे पर्यंत वाढवला लॉकडाऊनचा कालावधी, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

208
प्रतिनिधी मुंबई ..

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता. पण, आता या लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, लॉकडाऊन येत्या 15 मे पर्यंत कायम असणार आहे. आज राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत वाढती रुग्ण संख्या पाहता आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याची मागणी अनेक मंत्र्यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांच्या निर्णयाबद्दल सहमती दर्शवली आहे. त्यामुळे राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.